Pages

Wednesday, July 28, 2010

पारधी

तीन वर्षा पूर्वीची गोष्ट आहे........ मला नोकरीत कायम केल होत. मी साधारण ७ वाजता कामाहून बाहेर आलो. मला तो आनंद साजरा करायचा होता. पण त्या अंमळ वेळी एकही मित्र जागेवर नव्हता. मग मी एका नख्या मित्राच्या घरीच गेलो. माझा हॉटेलमध्ये जायचा प्लान होता. तोही तयार झाला. अर्धा वाटेवर आल्यावर म्हणाला "माझा एक मित्र आहे, तो मुंबईत नवा आहे आणि त्यान होटेल पाहिलही नसेल." मला थोड विचित्र वाटल. मी हो म्हटल्यावर आम्ही तडक त्याच्या घरी गेलो.
कार्यालयात प्रवेश केला तर संपूर्ण अंधार. कार्यालयाच बिल भरल नसल्यामुळे वीज गेली होती. आणि हा हातात अवघा रुपया घेऊन मेणबत्ती आणू की धगधगत्या स्टोसाठी पिन याच विचार करत होता. आम्हाला पाहता ओशाळून गेला. विचारपूस होता होता हा सटकला..... मेणबत्ती आणायला. कार्यालयातल्या अधूक प्रकाशात पाहिलं. तर तेथे वापरण्याजोग काही नव्हत, भिंतीच रंग गेला होता. तुटक कपात आणि दोन खुर्च्या. एक फाटकी ब्याग त्यात वह्या, पुस्तक, कपडे, अंथरून पाघारून, एकाला जगण्यासाठी लागेल ते सर्व काही.....एका कडेला स्टोवर मुग शिजत होते त्याच त्या रात्रीच पौष्टिक आहार (मागील तीन वर्ष रात्री तो तेच घेतो आहे)मित्र ला खूप विचारल हा कोण? कुटचा? कार्यालायात काय करतो? कधी आला? केव्हा जाणार? पण याने कशाचीही दाद दिली नाही. मग मुकाट्याने होटेल गाटल. आणि आम्ही तिघांनी तो आनंद साजरा केला.
आज तो दिवस लक्षात राहिला तो मला नोकरी लागण्यापेक्षा त्याच्याबरोबर ती संध्याकाळ साजरी केली म्हणून.....
नंतर कधीतरी मित्राने त्याची गोष्ट सांगितली. आणि मी एक पुस्तक वाचल त्याची व त्याच्या सारख्याची गोष्ट सविस्तर समाजण्यासाठी........

पुस्तक- पारधी.
ले.- गिरीश प्रभुणे

पुस्तकाबद्द्ल बरच काही लिहणार होतो.
पण आता काही आठवतच नाही. लक्षात राहिल ते प्रभून्याच मनोगत, त्याच्या सारख्या असंख्य कार्याकात्याच्या धडपडी,
एक शाळा, एक वसाहतीगृह, एक समाज याच्यासाठी घेतलेली अपार मेहनत, जिद्द
त्या असंख्या पारध्याच्या कहाण्या.........

आज आपण कोणत्या युगात जगतो आहोत. आणि हा पारधी समाज कोणत्या परिस्थितीत आहे? समजण्यासाठी......

Monday, July 26, 2010

काश्मीर- धुमसते बर्फ

पुस्तक तसं जुनंच आहे.
पुस्तकाचा विषयही तसा जुनंच आहे.
पण यात आज माडलेली समस्या आजही तशीच आहे. (तशा अनेक समस्या आजही कायम आहेत.)
पण मी बोलतोय मागील सात दिवस धुमसणाऱ्या काश्मीर बद्दल..........
“काश्मीर धगधगते आहे. नंदनवनातले चिनार पुन्हा होरपळले आहेत. निसर्गरम्य प्रदेशात दगडफेक विरुद्ध गोळीबार असा अपरिहार्य संघर्ष पेटला आहे. रडणं, विलापणं आणि नीरव रात्रींना चिरत जाणारे आक्रंदन, मुलांचा आणि मातांचा आक्रोश, पुन्हा सुरू झालाय. थिजलेल्या रात्रीवर विलापणाऱ्या ताऱ्यांचा मुकुट आहे तर चंदासह अवघे तारांगण इथे दु:खात भिजले आहे. गेल्या काही वर्षांत असे वाटत होते की बंदुकी आणि संगिनींच्या छायेत वावरणारे श्रीनगर खोरे आता शांत झाले असावे. महिनाभरातल्या घटनांनी मात्र नंदनवनाच्या शांततेला पुन्हा ग्रहण लागले आहे. “
हि बातमी ५ जून च्या म. टा. आली, सर्वात आधी आठवल ते हे पुस्तक
काश्मीर समस्येबाबत सत्य उजेडात आणणारे जम्मू काश्मीरचे राज्यपाल जगमोहन याचे खळबळ जनक पुस्तक
Frozen Turbulence in Kashmir
“वास्तव” या पुस्तकाचे सामर्थ्य आहे भारतीय घडामोडीत (राजकीय इतिहासात) आस्था असणाऱ्या प्रत्येकाने वाचायलाच हवे अस पुस्तक -N.S. jagannath (Indian Review of books)
पुस्तक म्हणण्यापेक्षा मी त्याचा ग्रंथ म्हणूनच उल्लेख करेन. जम्मू काश्मीरवर लिहिलेला शास्त्रशुद्ध प्रबंध. जो वाचता येईल व कळेलही. जम्मू काश्मीर समस्या पुढल्या ५० वर्षात तरी संपणार नाही आणि ती आताही इतकी ज्वलंत आहे की त्या बद्दल कुतूहल न संपणारे. लेखक जम्मू काश्मीरचे राज्यपाल राहिलेले तसे ते, इतरही केंद्रशाक्षित राज्याचे उपराज्यपाल होते. हाडाचे पत्रकार आणि पद्मविभूषणाने सन्मानित. त्यामुळे पुस्तकाच्या सत्यतेवर शंका घेण्याच कारणच नाही आणि इतका base मिळाल्यावर पुस्तक बेस्ट सेलर होणार यावर वादाच नाही. तस ते झालाही. पण त्याच याहून खर कारण त्याचा जिवंत विषय. प्रकाशकाने म्हटल्या प्रमाणे नुसत्या अनुक्रमाणीकेवर नजर टाकली तरी पुस्तकात काय दारू गोळा असेल याचा अंदाज येतो.
वास्तविक पुस्तकाची लेखकाने दोनदा राज्यपाल या नात्याने आलेल्या कारकिर्दीत (२६/४/८४ ते १२/०७/८९ व १९/०१/९० ते १६/०५/९०) अनुभावलेल्या अत्यंत नाटयमय/दुखद राजकीय प्रसंग व प्रश्नांचीची मिमासा केली आहे. ते आपल्या आताच्या दृष्टीने निरर्थक असल तरी पुर्वोतिहास ,३०७व्या कलमाची कुळकथा, जुने प्रश्न : गुंतागुंत नवी , धोक्याचे इशारे , पाळेमुळे आणि इतर अनेक प्रकरणे वाचनिय आहेत. काश्मीर समस्येचा मुळ गाभा समजण्यात त्याचा फार उपयोग झाला. या बाबतीत केंद्र व राज्य सरकार काय ठरवून करू शकते व मुस्लीम मतान वर डोळा ठेऊन काय ठरवून करत नाही याच उत्तर देखील कदाचित मिळेल.
पूर्वाचल बद्दल लिहिताना फाळणीच्या वेळी भारत सरकारने ज्या टीगभर चुका केल्या त्याचं पूर्वाचल हे ठळक उदाहरण असं मी लिहल त्या बद्दल खरच माफ करा कारण यात काश्मीर चा क्रमांक पहीला.
आपल्या उथळ, वरवरचा विचार करणाऱ्या शेख अब्दुल्लासारखा नालायक माणसाचे फाजील लाड पुरवणाऱ्या नेहरू सरकारची कीव करवी तितकी थोडी आणि नंतर येणाऱ्या राज्यकर्त्यांना या परिस्थिती मागे फरफटत नेणारी लाचारी ज्यावर खंबीरपणे उपाय न घेता जवळचा फायदा घेण्याचा व्याभिचारीपणा. याच समग्रदर्शन पुस्तकाच्या पानापानात आल आहे नेहरू सरकारने काश्मीर प्रश्नी जी डोकेदुखी समस्त देशाला दिली त्याची यथार्थ “वाचनीय” कहाणी.

सारे प्रवासी घडीचे............

जयवंत दलावीचे हे पुस्तक माझ्यासाठी पर्वणीच.......
म्हाताऱ्या कुत्र्यावर काठी मारली की, तो जसा हेल काढीत केकाटतो. तसा जीवा आलाप मारायचा. किवां कुल्यावर पानी घाल म्हटला, तर पानी घाल. लोंबत काय म्हणून विचारू नको. समजला? असे मनाला “निखळ” आनंद देणारे आणि तेवढीच हुरहूर लावणारे अनेक किस्से या पुस्तकात आहेत आणि परत वाचतानाही फार मजा आली. पण रागहि तेवढाच आला कारण शेवटची ओळ “सर्व पात्रे आणि प्रसंग काल्पनिक आहेत”.
गाव, शाळा, नरू, बागईत, अमृते, पावटे सर, वामन दाजी आणि इतर शेजारी, आबा, बाबुळी आणि शांतानाव्ही प्रकरण, रवळनाथाचे देऊळ, दशावतारी आणि इतर अनेक पात्रे अशी हुबेहूब आली आहेत की कोकणातल्या कोणत्या ही गावाचे वर्णन असेच असेल याचे प्रत्यय येत गेले. हे पुस्तक पुलाच्या पुस्तकासारखे hit का झाले नाही याचे नवल वाटते. मला या पुस्तकाचे इतके कोतुक अशासाठी की मी पक्का कोकणी आहे आणि शेवटच्या एक दोन पानात आलेल कोकणाचे सार अनुभावातो आहे. माझ्या बालपणीच्या कितेक सुट्ट्या मी स्मरू शकलो याबद्दल दळवीचा आभारी राहीन.
कोकणाच्या आणि कोकणी माणसाच्या एकूण परिस्थितीत कालानुरूप तीळमात्रही फरक पडला नाही याचा खेद वाटत राहतो.
आणि हो मुंबईच्या धुमश्चक्रीत राहिलो तेथे परका आणि आता स्वताच्या जन्मस्थळी सुध्दा परका हे दळवी चा वाक्य मला तंतोतात लागू पडत.

पूर्वांचल

हे पुस्तक मित्रांने अनपेक्षितपणे दिल्यावर मला काय आठवल असेल ........................................... “चक दे इंडिया” दोन तरुणी reservation counterकडे येत असताना त्यांना काही तरुण चिडवतात, का तर त्याच्या cheniase, nepali looks वरून, तर दुसरीकडे counterवाला त्यांना त्या भारतात पाहुण्या म्हणून आल्याबद्दल शुभेच्या देतो. त्यावर त्याच उत्तर असत, “आपल्याच देशात, पाहुणा म्हणून घेण्यास कोणाला आवडेल.”
या पुस्तकाचे वाचन करत गेले आणि आपल्याला एकंदरीत पूर्वांचल, त्याची संस्कृती ,इतिहास, भूगोल भाषा,.............याबाबत किती “ज्ञान” आहे याची जाणीव होत गेली. “असम, नागालँड, अरुणाचल प्रदेश, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, व मेघालय या सात राज्याची सांस्कृतिक सफर” अस पुस्तकाच subtitle असल तरी ते बदलून “तुमच्या अज्ञानाची सफर” अस असायला हरकत नव्हती.
ह्य राज्याचा संस्कृतीक, भोंगोलिक, इतिहास माहित असण्याची शक्यता आपल्याला नसते पण या सात राज्याची नाव जरी न अडखाळता सांगता आली तरी खूप, अशी आपली स्थिती आहे. अमेरिका, ब्रिटन येथील उपनगराची नावं आपल्याला जवळची वाटतात पण या भारताच्याच राज्यानं/शहारानं बद्दल आपल असं का व्हाव याबद्दल मला सारखसारख आश्चर्य वाटत आल आहे.
आता या पुस्तक बद्दल थोडस, पुस्तक प्रचंड फार वाचनीय झाल आहे. खर म्हणजे फार informative आणि कंटाळवाण नाही. लेखकाने म्हटल्या प्रमाणे ते प्रवासवर्णन नाही, ते आत्मकथन आहे. पूर्वांचलंच्या इतिहास, भूगोल, संस्कृती, अर्थकारण, समस्या बद्दल (जे आपाल्याला माहित नसल्याने) असल्याने फारच रोचंक झाले आहे.
ब्रम्हपुत्रा नदी नसून नद आहे (म्हणजे काय ते पुस्तकात वाचा) आणि भारत एकूण तीन नद आहेत किंवा या नदात तयार झालेल माजुली (असम) हे गावं, जगातील सर्वात मोठ निवासी बेट आहे. किंवा पूर्वांचलातील ब्राम्हण मंडळी अगदी सरसकट मासे खातात.(त्यांच्या लग्न, मुंज इत्यादी.... सभारंभात मांसाहारी पदार्थ असतात) असमचा आपण आसाम असा उल्लेख करतो किंवा मणिपूरची भाषा मणिपूरी नाही तो फक्त नृत्याचा प्रकार आहे. किंवा त्याचे कपडे, भाषा, जेवण, घराची रचना, प्रचंड वेगळी का आहे? किंवा काही राज्यात मातृसत्ताक पद्धती आहे.(मुलगे लग्न झाल्यावर सासरी जातात वगेरे) किंवा तेथील एका देवळाचे ३९ पिढ्यांन पासून पुजारी देशमुख या आडनावाचे आहेत. इत पर्यन्त रोचंक माहिती मिळेल. बऱ्याच गोष्टी नव्याने कळल्या आणि त्या सर्वच interesting आहेत.
इतिहासाच्याबाबतीत म्हणायचं झाल तर फाळणीच्या वेळी भारत सरकारने आणि त्यानंतर आलेल्या वेगवेगळया सरकारांनी ज्या ढीग भर चुका केल्या त्याच पूर्वांचल हे ठळक उदाहरण आहे. सिल्हेत हा जिल्हा (त्याच सामरिक महत्व न ओळखता) पूर्व पाकिस्तानला (बाग्लादेश) आपण भेट म्हणून दिला किंवा त्या परिसरातील एकमेव बंदर आपण पाकिस्तानला आनंण म्हणून दिले. जेथे बहुसंख्येने हिंदू होते त्यांना कोणात्याही परिस्थितीत पाकिस्थानात सामील होण्यात रस नव्हता. किंबहूना १५ ते २० दिवस तेथे तिरंगा फडकत होता. तेथील राजकीय नेते भारतात सामील होण्यासाठी कंठ शोष करत राहिले. याची माहिती पुस्तकात येत रहाते. (पुस्तक वाचताना एक नाविनच विचार मनात येऊन गेला. फाळणीत भारतापासून पूर्व आणी पश्चिम पाकिस्तान वेगळे केले गेले अस आपण म्हणतो, पण म्यानमार, अफगाणिस्तान, श्रीलंका, नेपाळ, भूतान कधी आणि केव्हा वेगळे झाले ते कळत नाहींत. किंबहूना ते भारताचा भाग होता अस आपण बोलत देखील नाही.)
आणि आताच्या घडीला सांगायचं तर पुर्वाचालातील अरुणाचल प्रदेशम, नागालँड, मिझोरम या राज्यात जाण्यासाठी आपल्याला परमीट घ्याव लागत. स्वतंत्र भारताच्या या राज्यात जाण्यासाठी तुम्हाला पूर्ण दोन दिवसचा सोपस्कार करावा लागतो, कमाल आहेना. त्रिपुरा सारख्या राज्यात रात्री पाच नंतर public transport बंद होतात किंवा पडतात. तुम्हाला तेथून बाहेर पडण्यासाठी फक्त आणी फक्त सकाळी सहाची बस पकडावी लागते कारण पुढचा सारा प्रवास साधारण १२ ते १४ तासाचा आहे व तेही पूर्णपणे पोलीस संरक्षणात. या आणि इतर अनेक राज्यात तुम्हाला सीमा सुरक्षा दलाच्या अनेक अंगझडतीतून जावं लागत. भूतान, म्यानमार, चीन, व बाग्लादेश या देशाच्या अंतरराष्टीय सीमा तुम्हाला मुक्तपणे CROSS करताना तेथील स्थानिक रहिवासी दिसतील आणि त्याच वेळी वृत्तपत्त्रातून ”या देशातून भारतात घुसघोरी होत नाही.“ अस सांगाताना आपले कॉगेर्सी मंत्री आठवतील.
पालीस्तानी अरब किंवा काश्मिरी निर्वासितनबद्दल आपण किमान ऐकून तरी असतो पण पूर्वांचलातील ६० वर्षापासून असलेल्या बाग्लादेशी, म्यानमार निर्वासिताच्या छावन्या बद्दल आणि त्याचा समस्या बद्दल न आपल्याला ऐकून आणि वाचनहि माहिती नसते. तेथील बेकारी, हिंदी भाषिकशी होणारे दंगे किंवा नागा, बोडो यांची स्वतंत्र राज्या मागण्या बद्दल आपण ऐकून असतो पण राष्ट्रीयएकात्मतेवर घाला घालणाऱ्या ख्रिश्चन धर्मातारणावर मला येथे नव्यानेच कळले. धर्मातारणाने राष्ट्रीय एकात्मता कशी भंग होते हे जाणून घेयाची इच्छा असेल तर पुस्तक जरूर वाचा.
या भागामध्ये खिश्चन मिशानार्यांचा धर्मप्रचार नी धर्मप्रसार पूर्ण ताकदीनिशी चालू आसतो. त्याचा प्रचार आणि प्रसार शाळा नी रुगानालय ह्या दोन माध्यमातून चालू असतो, त्यामुळे ते थेटघरात पोहोचतात. त्याच्या अथक प्रयान्ताना तसं “थोडंफार” यश मिळतही असत. २००० साली मिझोरम सरकारने संपूर्ण मिझोरम ख्रिश्चन झाल्याचा उत्सव साजरा केला. नागा, बोडो या MAJOR जाती सोडल्यास इतर अनेक जाती पूर्णपणे ख्रिश्चन झाल्या आहेत. हे आदिवासी आपली संस्कृती विसरत चालले आहेत. प. बंगालवरून या राज्यात जाण्यासाठी जी ४०किमी रूंदीची पट्टी शिल्लक आहे त्यात बाग्लादेशी मुस्लीमाची लोक्संख्या झपाट्याने वाढळी आहे. या राज्यात बांगलादेशी घुसघोराची लोकसंख्या २०%पेशा जास्त आहे. आणि हि बाब दुर्लाश्न्याजोगी नाही पण हि परिस्थिती हळूहळू का होईना बदलत आहे या संधार्भात RSS आणि संघ परिवारच्या चांगल्या कामाची माहिती पुस्तकात आली आहे. पण खिश्चन मिशानार्यांच्या प्रचंड आर्थिक ताकदी पुढे या भारतीय NGO’S कूठ पर्यत टिकणार?
अशा परिस्थितीत आपल्याला काय करता येईल ? या प्रश्नच उत्तर लेखकाने वेळोवेळी दिल आहे (अगदी कृतीतूनही) तिथल्या सामान्य माणसाला आपल्या कथाकथीत Mainstream जवळ आणता येईल. आपण आपल्या “व्यस्त जीवनातून” तिकडे पूर्ण वेळ जावं आणि तेथील NGO’S ना मदत करावी अस् मी तरी म्हणणार नाही. पण निदान प्रत्येकाने एकदा प्रवासी म्हणून शक्य नसेल, तर निदान पर्यटक म्हणून तरी पुर्वाचालात जाऊन याव, तेही एक कार्यच आहे. (तेथील परिस्थिती स्व:त पाहावी, cameraत उतरवावी व मित्रपरिवाराला दाखवावी) एवढी आणि एवढीच माफक अपेशा या पुस्तकातून लेखकाने अपेक्षिली आहे
येत्या वर्षात ती मी पूर्ण करेन एवढ वचन मी स्व:तला दिलंय.........